मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

एक स्वप्नच लेखकाचं

 



आदरणीय प्रतिलिपी माई,
महोदया,
स.न.वि.वि.
               महोदया, मी मोहन सोमलकर कवी, लेखक, नागपुर.  तसा मी १९९७ पासुन लिहित आहो. मला काॅलेज मध्ये असतांना पासुन  शीघ्र कवित्व प्राप्त झाले. मी अनेकांच्या नावावरती कविता त्यावेळेस लिहल्या होत्या. नाॅनस्टाप कविता ,शायरी मी करायचो, मी नागपुरात " धनवटे नॅशनल काॅलेज " च्या हाॅल मध्ये मोठ्या जनसमुदायासमोर "माझी मैत्रिचं नातं ही विनोदी वर्‍हाडी कविता सादर केली होती. पहिल्यांदाच सादर करत असल्यामुळेच माझे हात कापत होते. पण मी हिम्मत हारली नाही. पुर्ण कविता सादर केली. कविता एवढी सुंदर होती की, प्रचंड मला प्रतिसाद मिळुन मला टाळ्यांचा गडगडाट मिळाला. तिच माझी प्रेरणा ठरली. पुढे मी काॅलेजचे प्रतिनिधित्व करत तीन व्यक्ती " यवतमाळात, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ने आयोजित केलेल्या, साहित्य सम्मेलनात सहभागी झालो व तिथे मंगेश पाडगांवकर सर, विठ्ठल वाघ सर, सुधाकर गायधनी सर .... हे सगळे भारताचे विख्यात कवी . यांच्यासमोर कविता सादर केली.

तिथे अनेक राज्यातील लोक कथा, कविता, शायरी सादर करायला आले होते. ते तीन दिवस साहित्यिक वातावरण पाहुन प्रचंड जनसमुदाय पाहुन सगळेच परतीच्या वेळेस भाऊक झाले होते.
       माझे मित्र भोजराज साठवणे, प्रदीप मोटघरे, कवि कलाम यांची प्रेरणा मला कविता लिखाणात मिळाली.

     मग आता मी वीस वषाॅनंतर प्रतिलिपी हे व्यासपीठ लाॅकडाऊनपासुन जाईन केले इथे मला खुप मित्र,  माझ्या बहिणी, वरिष्ठ लोकांनी माझ्या लिखाणाला खुप प्रतिसाद दिला. मला भरभरुन प्रेम दिलं.

       पण आता कुटूंब व नोकरीच्या व्यापापाई मी जास्त लिखाण करु शकत नाही.
      आणि आता प्रतिलिपीवर विषयही बरोबर दिल्या जात नाही.
      माझे प्रतिलिपीवर एकच स्वप्न आहे, ते म्हणजे एकदा तरी, संपुर्ण विभागात नाहीतर चारोळित प्रथम यावे. खुप दिवसांपासुन मी तसा प्रयत्न करित आहे. पण साध्य होत नाही.

ज्यादिवशी मी प्रथम येईल,तो दिवस माझ्या जीवनातला अनमोल राहिल.

        मग मी प्रतिलिपी सोडुन देईल.
तोपर्यंत मी लिखाणावर भर देईल.

    मला प्रतिलिपीवर जे प्रेम मिळाले, ते मी आयुष्यात कधी विसरणार नाही. आबासर, येवला सर, आणि इतरही खुप लोक आहेत. ज्यांनी लिखाणात मला मोलाचे मार्गदर्शन केले.

     त्या सर्वाना व प्रतिलिपीला मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही.

धन्यवाद
आपला लेखक
मोहन सोमलकर
नागपुर 🙏🙏🙏🙏🍁
==========================
Copyright ©️


तडजोड

 

From my quote 


तडजोड ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. दत्तु जोशी हे व्यक्ती दिव्यांग होते. मनाने साधे सरळ जीवन जगणारे. घरची परिस्थिती
साधारणच होती. एका मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्यात ते काम करुन आपली उपजीविका करत. त्यांच्या कायाॅवर घरातल्या मंडळींला खुप अभिमान होता.
      त्यांच्या दिव्यांगतेवर त्यांच्या बायकोने कधीच प्रश्न केला नाही किंवा त्यांना कधीच कमीपणा भासू दिली नाही उलटपक्षी दत्तुजीची पत्नी महिला बचतगटा अंतर्गत पापड लाटायला एका ठिकाणी जायची. तेवढीच कुटुंबात मदत व्हायची.

        दत्तु जोशींना एक मुलगी होती. गावापासून दुर सहा किलोमीटर दुर पायपीट करुन शाळेत जायची मुलगी रंजना अभ्यासात खुप हुशार होती. वगाॅत तिचा दरवर्षी पहिला नंबर यायचा . घरचे सवॅ कामे करण्यात आईला मदत करुन ती बाकी वेळेस, तर कधी रात्र जागून आपला अभ्यास
करायची.
         दत्तुजीला आपली मुलगी पायपीट करुन शहराच्या ठिकाणी शाळेत जाते. त्यामुळे तिला त्रास सहन करावा लागतो व तिचा,जाण्यायेण्यात वेळही जातो.
       याचे खुप वाईट वाटत होते. एक दिवस
त्यांनी त्यांच्या बायकोला मुलीसाठी जुनी सायकल घेऊ या. म्हणुन चर्चा केली.
       सायकल घेण्यासाठी त्यांची पत्नी तयार झाली. जुन्या सायकलसाठी पैसे जमवाजमव सुरु झाले.
       आपल्याला शाळेत जायला सायकल मिळणार या आनंदात रंजना खुप खुश होती.
ती आईला बिलगुन  आनंद व्यक्त करु लागली.

       एक दिवस तिचे वडिल शहरात जुनी सायकल घ्यायला गेले. शहरातील सायकलच्या दुकानात सायकल पाहुन तिची किंमत  दुकानदाराला दत्तुजीने विचारली असता., दुकानदार दत्तुजीला भाव देत नव्हता. त्याने दत्तुजीला वागणुक बरोबर दिली नाही. हे कृत्य तिथुन जाताजाता गटविकास अधिकारी दुरुनच पाहत होते.
      त्यांनी दत्तुजीची सवॅ शहानिशा केली. व त्वरीत त्या गरिब मुलीची शिक्षणाबद्दलची जिद्द पाहुन व वडिलांची मुलीला शिकविण्याची जिद्द पाहुन नविनच छान सायकल त्या मुलीला म्हणजेच रंजनाला घेण्याचे ठरविले.
       अशाप्रकारे दत्तुजी जोशीचे मनोबल वाढवून गटविकास अधिकाऱ्याने त्या मुलीची व दिव्यांग वडिलांची पाठ थोपटून शाबासकी दिली.
       व आदराने त्यांना नविन सायकल भेट करुन समाजात माणुसकीचे ताजे उदाहरण देऊन अजरामर केले....!


धन्यवाद !

        समाप्त

=========================
लेखक:-     मोहनिल (मोहन सोमलकर)


ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...