मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

मराठी भाषा दिन🌏


 जागतिक मराठी भाषा गौरव दिन

माझ्या मराठीचिया आहे जगी मान मोठा

धन्य धन्य शिवराय ,धन्य झाला जो इथे जन्मला..!


मुहूर्तमेढ मराठीचिया रचलीया संत ज्ञानेयाने ..!

तुका झालेसे कळस, निवृती,सोपान,नामदेव,मुक्ताईने दारी लाविली मराठीची तुळस...!


बिजे माझ्या मराठीची रोवली अनेक संतानी॥

पाणी घालुनि अमृतसिंचन केले महंतांनी॥


माझ्या मराठीचिया लई बाणा मोठा॥

भाषा माझी मधुर गोड इतुकी संवादाचा नाही इथे तोटा॥


वेल आकाशी दुर बहिणाबाई,केशवसुत,कुसुमाग्रज,पुलंनी नेला.!

श्वास मराठीत मोठ्या मोठ्यानी घेऊन, शेवटी देहही इथे अर्पिला.!


मराठिचियी  थोर साहित्यिकांनी उंचाविली मान ,आणि शान ॥

नसानसात मराठीचा सुगंध भिनविला मराठीचे पिकविले रान॥


अभंग,गीत,भारुड,पोवाडे,कवन,गवळण,गझल ,गाऊनी मराठीचे 

उंचाविले स्थान ॥


जे जे झटले मराठी भाषेसाठी,जगले जागले ,त्यांची करा आठवण

मराठीचा रोवला अटकेपार झेंडा,या महान विभुतीची ठेवा जाणं..॥


जसा कळी आणि फुलात सुगंध आपोआप येतो...!

जसा चंदनाचा सुहास मनामनात भिणतो.....!

जसा कस्तुरीसुगंध श्वासात मिसळतो...!

माझी मराठी झाली मोठी स्वर तिचा जगी घुमतो.!


आता नवयुवक, नवयुवती,साहित्यिक, प्रतिभावंत 

धुरा तुम्ही मराठीची रे घ्या सांभाळून  पुढे..!


पोथी, ग्रंथ, वेद,उपनिषदे , गीता,रामायण, बायबल,कुराणाचे करा जतन॥


मराठीत बोला बोली मराठी, गीत गा, शाळेत मुलांना शिकवा मराठीत! 

मराठी आपुली न्या पुढे पुढे....!

मराठीचे स्वर,व्यंजन, उपमा,अल॔कार,लय जतन करावे.!



धन्य  धन्य माय मराठी, मुळ मराठी कुळ मराठी....!



मोहन सोमलकर 

©️®️

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✍✍✍✍✍✍

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

यातना.....!!

 यातना

यातना जरी किती तिला

ति कोणाशी कुजबुजली नाही

धैर्याने ती सामोरी गेली

ती शिवबाच्या मातीतली भिली नाही..!


यातना जरी किती तिला

ती संकंटाशी घाबरली नाही

पथ संकटाचा चालत गेली

जिजाऊचे काळीज तिचे ती घाबरली नाही..!



यातना जरी किती तिला

ती विसावा कधी घेतला नाही

मार्ग काट्याचा तुडवत गेली

पी.व्ही सिंधूचे मनोबल तिचे ती हरली नाही..!


यातना जरी किती तिला

बापाची छाया, आईची माया तिच्यावर ती थांबली नाही.!

विपरीत परिस्थितीही पुढे गेली

लताचा स्वर तिच्या कंठात होता जीवनगाणे तिने थांबविले नाही.!




मोहन सोमलकर ©️®️✍✍✍✍✍✍

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

कल्पनाताई चे कल्पनाविश्व

 


कल्पनाविश्व


जुंपुनी शब्दाचे अश्व

सारथ्य ती साहित्या करे

शब्दसाठा तिच्या मनी

ती साहित्य क्षेत्र काबिज करे


मनधरणी तिची कोण करील

विनवणी तिची कोण करिल

ती शब्दमेघ साहित्य नभातली

डोईवर प्रतिभाछत्री कोण धरिल


स्वभाव तिचा बाप्पाची देण

कुणाशी तिला नाही देणघेणं

मायेची कास तिच्या अंगी

प्रेमाचं तिच्या फेडावे कसे ऋण


कल्पनाविश्वात मी रममान झालो

शब्दसागरी तिच्या मी न्हालो

धागे ऋणाबंधाचे मनाशी गुंतवित

सुखीसमाधानी मी झालो..!


असावी जुळलेली गतजन्माची नाळ

आठवत नाही आता मज तो काळ !

नाते स्नेहाचे असावे तिच्याशीच 

रक्ताचे असेल पुर्वी, प्रेमाने भरे आभाळ.!!


लढलो झगडलो असेल कधी

त्याचे यतकिंचितही बुरे न वाटे

स्नेह,वात्सल्य, आपुलकी वाढत गेली

अंतःकरणी दोघांच्या जीव प्रेमाचा दाटे.!!


काटा तिला पायात रुतावा

जीव माझाच हळहळावा

वेदना जरी तिला झाली 

भावाच्याच डोळी अश्रु यावा..!


नाते हे रेशीमबंधाचे

माथ्यावरल्या चंदनगंधाचे

मनीगटी जरी रक्षाबंधनी नाही बांधले

जुडले राहिल सदैव ते मनाचे...!!


कल्पवृक्षरुपी कल्पनाताई 

जणु प्रेमळ ममत्व तिच्या ठायी

बाप्पाचा आशिर्वाद सदा तिच्या शिरी

सदा ती हर्षाचेच गीत गाई...! 


लेखणीने तिच्या घ्यावी भरारी

शब्दात प्रतिभा आपली उज्ज्वल करावी

साहित्यातुन लिखाण करुनि

प्रगतीची नव वाट चालावी....!!



शुभआशिष असा तिला शुभदिनी द्यावा

आनंदाचा प्रत्येक क्षण साजरा व्हावा

सौख्याने ,आणि समृध्दीने 

अंगणी तिच्या आनंदी पारिजातक फुलावा..!!



मोहन सोमलकर 

गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२

खरी माणुसकी

 


विषय:- माणुसकी दाखविली (लघुकथा)वास्तव 





माणुसकी दाखविली 


उमेश सदन घरचा भरल्या कुटुंबात राहणारा एक व्यक्ती होता. नवराबायको एक मुलगा एक मुलगी उमेशचे आईवडील ,परत त्याचा मोठा भाऊ ,त्याचा परिवार मुले बाळे असे एकाच घरी राहायचे. 


उमेशचे किराण्याचे दुकान होते. रोजच तो आणि त्याचे वडिल किराणा दुकानात राब राब राबून कुटुंबासाठी कष्ट करायचे. त्याचा मोठा भाऊ खाजगी नौकरीत होता. तो त्याच घरी वेगळा राहायचा,पण पारवारिक कार्यक्रम प्रसंगी सगळेच एकत्र यायचे.


अशातच मागल्या वर्षी सार्‍या देशात भयंकर कहर केला होता.

तसा नागपुर शहरातही कोरोना या महामारीचा खुपच कहर होता.


           मोठमोठी खाजगी व सरकारी रुग्णालये कोरोना रुग्णांनी भरलेली होती. नागपुर शहरी एवढे इस्पितळ आहेत, पण एकही इस्पितळ एप्रिल महिन्यात खाली नव्हते.


             रोजच किराणा दुकानात गिर्‍हाईकांशी उमेश चा व त्यांच्या वडिलांचा संपर्क येत असल्यामुळेच आधी उमेश कोरोना पॉझिटिव्ह झाला. तो पंधरा दिवस रुग्णालयात भरती होता. 


            हिमंतीने पुर्ण खचला होता, पैसे खाजगी इस्पितळात भरती असल्यामुळेच भरपूर लागत होते, पण त्याने हिम्मत हारली नाही. विशेष म्हणजे त्याच्या वस्तीतील मित्रांनी या वेळेस खरी माणुसकी दाखविली ,त्याला हिम्मत दिली. त्याच्या पाठीशी उभे राहीले. 


पैश्याची थोडीफार मदत मित्रांनी केली. तो सुधरला होता. सोळाव्या दिवशी मित्र जेव्हा इस्पितळात त्याला आणायला गेले ,तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रु आले. 


        उमेश सुधारला पण अशक्त झाला होता. मित्र दोन त्याच्या जवळ त्याला आधार द्यायला गेले. तर उमेश म्हणाला," अरे.... मला तर कोरोना झाला होता ,तुम्ही हात लावु नका...! माझ्या दुर रहा..! तेव्हा मित्र त्याला म्हणाले , सोड यार मैत्रीसमोर काही बिमारी नाही." तुला काही झाले नाही, आणि आम्हालाही काही होणार नाही, दोन्ही मित्रांनी त्याला खांदा देऊन बगलेत पकडले व गाडित बसविले. व घरी आणले.



काही दिवसांनी उमेश चे आईवडील दोघेही पॉझिटिव्ह निघाले, दोघांनाही खाजगी रुग्णालयात भरती केले. पुन्हा पैश्याची जुळवाजुळव सुरु झाली. 



बाबा मनाने व तनाने धडधाकट होते, त्यांनी आलेले संकट सहन केले. आई मात्र नऊ लाख लागूनही वाचु शकली नाही. 


उमेश ची आई कोरोनामुळे देवाघरी गेली, तिला शुगर व बिपीचा त्रास होता. 


याही वेळेस मित्रांनी माणुसकी दाखविली आपल्या जवळील कोणी पन्नास हजार ,तर कोणी एक लाख देऊन या संकटाच्या वेळी मदत करुन माणुसकी दाखविली...!



माणसाची वेळेवर कामात आलेली मदत हिच खरी माणुसकी..!



मोहन सोमलकर 

नागपुर ✍✍✍🙏🙏📥

फुलाची गळती ,काट्याची फळती

 

काटा पायात रुतला तर चालेल

मनात काटा नका ठेऊ


काट्याची सल ह्दयावरी नका कोरु

हर्षाचे तुषार जीवनात उडवा..!


जीवन मानवाचे एकदा मिळाले

सार्थकी या जीवनाला लावा 

मनी गुलाब स्नेहाचे फुलु द्या 

मोहक नात्याची गुंफण मनी रुजवा


गुलाब लाल फांदीवरी फुलतो

टवटवीत त्यांची सुदंरता पाहुन 

रुतला जरी काटा बोटास 

वेदना घेतो आपण शमवुन.!


कुणाचे तरी श्वास तुम्ही

रुतलेला पायातला काटा दुर करा

सुड मनातला काटा काढुन काढु नका

काटा दुःखाचा बोचेल असे विचार नका करा..!


सुंदर दिसणार्‍या कळ्या,पाकळ्या,पाने फुले गळे

आठवण तयांचीही करत रहा.!

ते आधारस्तंभ असती आनंदाचे 

न्याय त्याच्याशीही करत रहा...!






मोहन सोमलकर 


मनातलं वादळ(असह्य)


 

मनातलं वादळ(असह्य )



माझ्या  मनात हा प्रश्न नेहमीच भेडसावत असतो.जेव्हा जेव्हा मी या समाजाच माझ्या  दृष्टीकोनातून आकलन करित असतो की, का? पिढी दर पिढी  स्त्री चा रुढी, परंपरा ,रितीरिवाज व वासना पोटी...... नुसता वापर होत असतो.
         का? तिच्या वर असे अन्याय,  अत्याचार होत असते.
का?ती रुढी परंपरेच्या  बेडी मध्ये लटकली जाते.
        या निमाॅण होणाऱ्या मनातील वादळाला मी किती दिवस असा सहन करत राहु. किती दिवस मी शमवत बसु.......याचे उत्तर  मला मिळणार  का..?

             आयुष्य भर मी माझ्या डोळ्यासमोर एका बंदीनीला पहात होतो. लक्ष्मीची पाऊले घेऊन ती त्याच्या सोबत घरात आली होती. ती अखंड आयुष्य लक्ष्मीच बनुन राहीली. पण त्याला नारायण होता आले नाही.  पहीले एक वषॅ सौख्य्याचे आणि समॄध्दी व प्रेमाचे गेले. पहीली मुलगी झाली......! त्यानंतर मुलगाही झाला. पण त्रास देणे त्या माऊलीला त्या राक्षसाचे सुरु झाले. शिकलेली होती ती, नर्सिग चे ट्रेनिंग केले होते. पण एक भारतीय स्त्री होती. आपल्या नवर्‍याचा जाच सहन करणारी एक बंदीनी होती. रोज सकाळी तो टिफीन घेऊन  कतॅव्यावर जायचा. तिकडून येता येता पोटात दारु ढोकुन राक्षस बनुन यायचा.
       असेच आयुष्य  रोजचे जगत गेला. कंटाळून कंटाळून तिही त्याच्याशी ते आयुष्य जगत गेली. मुले थोडी मोठी झाली . असेल मुलगी ७ वषाॅची आणि  मुलगा चार वर्षांचा एक दिवस मित्रांसोबत खुप दारु पिला. आणि कुत्रा त्याला चावला.दारुचे व कुत्र्याच्या चावण्याचे जहर झाले आणि  जीवनाचा सारा बोझा टाकुन तो हे तिचे आणि त्याचे जग सोडुन गेला.
       माऊली दोन पोटच्या बछड्याला घेऊन एकाकी झाली. कबंरेला पकडुन माझ्या आसंव्याच्या ओघाने दु:ख आपले स्त्रवतच राहीली.
      जीवनाचा गाडा ती आता एकटी खेचत होती. लक्ष्मीची पाऊले बाहेरच्या जगात पडली. मुलामुलींचे पालनपोषण होते, शिक्षण होते. दोन चिमुकल्यांसाठी ती आयुष्य भर रणरागिनी झाली आयुष्यात मुलांना एवढे लाड केले की,आयुष्याआरामाची जिन्दगी देऊन स्वत.  एका बंदिनीचे जीवन जगली. दिवसभर बाहेर काम करायची (अनुकंपावर नवर्याची ड्युटी माझ्या  वडीलांनी मिळुन दिली होती.)आणि घरी आली की , घरचे काम...!. मुले मोठी झाली होती. त्यांना पैशाची ना कधी झळ ना दुखाची कळकळ तिने कधी पोहचु दिली नाही. मुलगी शिकुन सवरुन डिग्री मिळवुन  लग्नाच्या मंडपात उभी राहीली. नशिबाने निरव्यसनी राजकुमार जबलपूरचा राहणारा. उच्चन्यायलयात ग्रंथपाल होता मुलगा  देखणा निरव्यसनी मिळाला.
       माऊली सुखावली मुलगी सुखावली. आयुष्यात पुन्हा डोळे तिचे तुडुंब हसु लागले.पण त्या हसण्यावर पुन्हा काळाने विरजन पाडले.
       मुलगा तिचा दारूच्या व्यसनी लागला.
काही दिवस असेच गेले त्याचेही लग्न झाले. त्याला मुलगा चांगला राहिला. मुलगा तीन वर्षांचा झाला . माऊलीचा मुलगा मात्र  पाण्यासारखा दारु पिऊ लागला. माऊलीचा पैसा होता हवेत उडवु लागला.
       एक दिवस माऊली नौकरीतुन निवॄत झाली. पाय तिचे थकले होते. डोके आणि  मन मुलाने थकवले. कष्टाची भाकर मिळवता मिळवता पार ती चंदनासमान झिजली होती. पोटच्या गोळ्याला जपण्यासाठी व आधार देण्यासाठी जीवन तिचे असेच संपले. पोटचा गोळा मात्र दारूच्या घोटात आयुष्य संपवायला लागला होता. तरुण रक्त होत. जोश होता बाहुबलात वादळालाही शमवण्याची ताकत त्याच्या मनगटात होती. पण नियतीने हे काय केले. त्याच्या हातात विषाचा प्याला घट्ट केला. जो व्हावा आधार तिच्या पायाखाली आपल्या  अंगाचे कातड काटा न रुतावा म्हणुन बिछवावा तर.......तिचा जीव तोडू लागला तो पैश्यासाठी तिच्या अंगावर हात टाकु लागला.
मनात माझ्या  खुप वादळ पेटले हे पाहुन. ...!!
        जिने त्या वंशाच्या  दिव्या साठी नऊ महिन्याचा काळ नऊ वषाॅगत सोसला....आपल्या  पोटाचा तिने बनविला होता घोसला...!तोच तिच्या जीवावर उठला.
           असा दिवा असण्यापेक्षा तिने अंधारच बरा असा विचार केला. तिचे होत असलेले हाल बघवेना ते पाहुनच मनात वादळ पेटत होते.
        खुप त्याला आम्ही  समजविले. प्रेमाने, रागावुन , दोन चपका गालावर मारुन कधी चिडुन कधी लहान असुनही त्याला हात जोडुन. ..🙏🙏🙏 पण तो मानेना. माऊलीला त्रास देणे त्याचे चालुच होते. पैसे नाही दिले तर मारणेही चालुच होते. होते नव्हते सवॅच लाड ती वंश्याच्या दिव्याचे पुरे करत गेली. त्याच्या दिलेल्या यातनाची जखम मनावर झेलतच गेली. सवाॅच्या मनात तिच्या प्रती खुप मोठे वादळ पेटले.
      एक दिवस सुधारगृहात त्याला टाकण्यासाठी  आम्ही  फोन केला. गाडी आली. चार माणसे पकडुन  त्याला गाडित टाकणार.....तेवढ्यात माऊली आणि त्याची बायको  आडवी झाली. माऊली म्हणे," कितीही त्रास दिला तरी तो, माझा पोटचा गोळा आहे, माझ्या नजरेसमोरच राहु द्या त्याला. त्याचे तिथे हाल होईल. मला रोज त्याला भेटता येणार नाही.
        ..अशातच झोपलेला तो पटकन उठुन संधी साधुन घरातुन पळुन गेला. सुधारगृह वाले रिकाम्या हातानी परत गेले. येण्याजाण्याचा खचॅ त्यांना द्यावा लागला.
        पुत्र कुपुत्र होऊ शकतो. पण माता कुमाता होऊ शकत नाही.  ती त्याच्या सहन करत राहाते मनात तिच्या  वादळ पेटुनही......पुत्र मोहापायी ते क्षमुन जाते...............

     धन्य ती माता धन्य तिचे मातॄत्व...!!!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
          मोहन सोमलकर 

©️®️ copyright @msomalkar


बुधवार, २ फेब्रुवारी, २०२२

जीवनाचे ताळेबंद

 


व्यापारीक वर्षा नुसार होते 

३१माचॅ  ला दरवर्षीच ताळेबंद 

जीवनाची उमेदीचे वर्ष जगलो 

केली गोळा बेरीज-वजाबाकी

काय हाती उरले ,अन काय गेले

हातातुनी रेती समान काय निसटत गेले

क्षण आनंदाचे वा दुःखाचे मी साठवत गेलो

पैसा,संपत्ती, ऐश्वर्य, ऐशोआराम कायम टिकून न राहिला

फक्त मी नाते व मैत्री ह्दयात जतन करित राहिलो.!

वयाच्या अर्धशतकाला राहिले फक्त तीनच वर्ष 

मी आनंदाच्या व समाधानाच्या कल्पवृक्षसमान बहरत गेलो

बहरत गेलो,शहारत गेलो,संतृष्ठ होत गेलो..!



मोहन सोमलकर

©️®️



एक स्त्री...... शक्ती द पावर...!

 


नका समजू एका स्त्रीला कमजोर 

तिच्या मनात व तनात  आहे जोर

फुकटच तिला नाही म्हणत कोण थोर

असते ती लहाणपणी नाजुकसशी पोर

मन नसतेच कधी तिचे चोर

दिशा पावलांना ती समजते



सर्वच ज्ञान तिला उमजते

नका होऊ कुणी शिरजोर 

सदैव असतो तिला कुटुंबाचाच घोर.!

कित्येक अडलेली कामे ती सिध्दीस आणते.!

कुणाच्याही मनातले दुःख ती जाणते.!

तिला मग का कोणी परकेपणाची वागणूक देते.!

जाणा एका स्त्रीची शक्ती.!

जाणा तिची कुटुंबाप्रतिची भक्ती.!

ती आहे...

🩸! Shakti the 🔋 power!🩸


मोहन सोमलकर 



ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...