मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

याद तेरी अचानक आई...!

 

Gallery 

🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡

दिलमे आरजु थी, उमंग भी थी....

तु मिलती रहे मुझे ना सही तो ना सही...!


बस एक बार हाल मेरा पुछ लिया करो....!


तुझसे खुब लगाव नही है मगर ,कभी कबार 


तेरी याद जरुर आती है .......!


जिन्दा हु तब तलक, मुझे मेरी सासो मे बसी है........!


ये याद तो दे....... दिया करो.....!




मोहन सोमलकर 🧡😊🧡🧡🧡🧡🎈



श्रध्दा-अंधश्रध्दा दोन बाजु नाण्याच्या.!

ऊ नमो वासुदेवाय नम:


साधारणत: आजपासून २० वषाॅपुरवी ,आणि त्याही आधी समाज एवढा अशिक्षित नव्हता. जेवढा स्वातंत्रपुवॅ काळात होता . पण समाजात असणार्‍या शैक्षणिक वातावरणाची तेवढाच प्रभाव समाजातील अशिक्षित लोकांवर नव्हता. 
    समाजातील अशिक्षित लोक त्यांच्या जीवनात जर काही अघटित घडले ,उदा. मुलांच्या तबियती बिघडणे,घरातील वातावरण सुखासमाधानाचे नसणे, जीवनात समृध्दी नसणे. तेव्हा बुवाबाजीकडे जाऊन आपल्या शंकेचे समाधान शोधत होते.
हे अशिक्षित लोकांचे झाले.

दुसरी बाजु शिक्षीत लोकांची

शिक्षित लोक श्रध्दा अंधश्रध्देचा भेद जाणुन असले तरी, त्यांच्या जीवनात जर अघटित असे बिकट संकंट आले असेल ,उदा. घरात कुणाचे आरोग्य बिघडले असेल आणि डाॅक्टर, वैद्याकडून आराम मिळत नसेल तर कुण्याच्या सांगण्यावरून बुवाबाजी कडे वळत होते. ते फक्त आपल्या घरातील जीवनाबद्दल असलेल्यां प्रेमाखातर..!


इथे मी थोडा थांबुन श्रध्दा-अंधश्रध्दा यातील भेद सांगतो.

श्रध्दा:- श्रध्दा म्हणजे एखाद्या व्यक्तीवर अथवा आपल्या कुलदेवतावर व कोणत्याही देवावर असलेली मनातील मनोभावे पुजावी अशीच भक्तीभावाची श्रध्दा,भावना,आदर ,एकाग्रता,साधना,तपश्चर्या होय.

अंधश्रध्दा:- अंधश्रद्धा म्हणजे शब्दातच अर्थ आहे, जादुटोणा,गंडादोरा,काळीजादु,बुवावाजी,बली यावर फुकटच काही मिळत नसणे व आपले नुकसानच होईल हे माहित असुनही बरेचसे लोक अंधश्रद्धेच्या जाळ्यात पडतात. अशिक्षित तर सोडा पण आजकालचे डाॅक्टर, वकिल पडतात . त्याला अंधश्रद्धा म्हटल्या जाते. 



ह्या दोन्ही बाजु मी प्रगट केल्या .

आता देवाबद्दल ची श्रध्दा सांगतो.


देव ,देवी,ईश्वर,अल्ला,येशु,गुरुनानक हे एकच आहे

अस्तित्व देवाचे
===========

देव निराकार,निरंतर,निर्विकार, सर्वव्यापी,अदृश्य शक्ती आहे. तो या निसर्गात, पानाफुलात,फळात,हवेत, पंचमहाभुतात आहे. त्याचे अस्तित्व या सृष्टीत सवॅत्र आहे .

देवावर आपली श्रध्दा असणे आवश्‍यक आहे,तो नजरेने दिसत नसला तरी रोज चोविस तासात एकदा तरी दाखला देतो आपल्या सोबत असल्याचा.

जीवनात परमेश्वराचे महत्व व अस्तित्व खुप मोठे आहे. 

जसे झाडावर आपोआप कळी येणे,फुल बनणे, फळ येणे, आईच्या उदरात नऊ महिने मासाचा गोळा राहुन त्याचे रुपांतर जीवात ,मनुष्यात होणे, नारळात पाणी आपोआप येणे. 


नशीबात व कर्मात असेल तर फार मोठ्या अपघातात देवामुळेच वाचणे, हे देव अस्तित्वात असण्याचे परिमान आहे. 

आकाश, पॄथ्वी,  वायु, अग्नी व जल हे पंचतत्व सुध्दा मानवजातीला देवस्वरुपी आहे. या पंचतत्वामुळे मानवजतीचे अस्तित्व आहे.
 
म्हणुन देवावर फक्त श्रध्दा,विश्वास, प्रेम ठेवा ,मनोभावे त्याला मनात पुजा !

आकाश,पृथ्वी,अग्नी,वायु,आणि जल हे सुध्दा मानवजातीने देवाच्या ठिकाणीच मानले पाहीजे. यामुळेच मानवजातीचे व सृष्टीचे अस्तित्व

शेवटी आपली हिन्दु संस्कृती विज्ञानाने कारणाने बनलेली आहे.  

आपल्या पूर्वजांनी खुप आधी आध्यात्माद्वारे खुप मोठे मोठे शोध लावले. नंतर मग इंग्रजांनी त्याचे पुरावे दिले.

आपला भारत विविधतेने नटलेला आहे. त्याची जगात मोठी ख्याती आहे.


काल माझी कुणाची मने दुखविण्याचा काहीच उद्देश नव्हता. मी फक्त मत मांडले होते.

मी देवावर विश्वास ठेवणारा आहो, देवपुजक आहो, पुजा केल्याशिवाय बाहेर निघत नाही.

कारण माझ्या बाबांनी मला ती संस्कृती दिली.

आणि या परमेश्वराच्या अस्तित्वामुळेच मी, माझे आईबाबा व माझे बाकी कुटुंब एका फार मोठ्या अपघातातुन मागच्या वर्षीच सुखरुप वाचलो.


टिप:-हा लेख मी एक तास खचॅ करुन लिहिला आहे, निदान पाचसहा लोकांनी तरी वाचुन प्रतिक्रिया द्यावी.

लेख लिहितांनी मी कोणत्याही साहित्याचा आधार घेतला नाही वा काॅपी पेस्ट केले नाही.


मोहन सोमलकर 🌿🍁🙏😊

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...