मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०२१

दसरा सण...!

 संस्कृती आपल्या देशाची

आहे आपल्या मातीची 

वेगळीच असते छाप 

प्रत्येक येणाऱ्या सणाची !


भारत पवाॅत दसरा सणाचे 

आहे महत्त्व खुपच अनमोल 

या दिवशी प्रभु श्रीरामाने रावणासोबत युध्द करुन, विजयश्री खेचून आणली त्याचे हे मोल!


आजच्या दिवशी आंब्याच्या पानाचे तोरण

दाराला बांधल्या जाते..!

पवित्र मन,मांगल्याने शस्त्र, अस्त्र,नित्यपयोगी अवजारे धुवुन त्याचे पुजन केल्या जाते.!


संध्याकाळी मांगल्याची सांज 

येते किर्ती, समृध्दी,प्रगती घेऊन दारी.!

प्रत्येक देवस्थानात, मातेच्या चरणी, आपट्याची पाने चढवुनि 

विजयदिवस म्हणुनी विजयादशमी करतो सारे आपण साजरी.!


दसर्याच्या दिवशी शिर्डीस 

येतात भाविक दशॅनास 

दसरा आणि साईबाबांची नाळ जुडली आहे

बाबांचा सदैव जिथे असतो वास..!


दसरा सण आहे मोठा

प्रेम, जिव्हाळा, आपुलकीचा नाही तोटा.

दिक्षाभुमीवर दसर्याच्या दिवशी बाबासाहेबांनी बौध्द बांधवांना धम्मप्रवॅतनाची दिक्षा दिली होती.!


दसरा हा दिवस असतो सोनेरी दिवस

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रेशीमबाग नागपुर

इथे असते शस्त्र पुजन मोठे.!

भव्य प्रांगणात होई सायंकाळी 

रावण दहन फार मोठे..!




एकुण दसरा या दिवसाचे

लौकिक आहे खुप भारी 

याच दिवशी असत्यावर सत्याची विजय होऊन दिवाळी सणांची इथुनच केली होती तयारी....!




मोहन सोमलकर 💕🎋🌷🙏💥💦🌿

दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा सवाॅना..!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०२१

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने .!

 धम्मचक्र प्रवतॅन दिनाच्या निमित्याने..!







महासुयॅ महामहिम डाॅ. बाबासाहेब म्हणजे भारत देशाला लाभलेला दुसरा जिता जागता महासुयॅ होता. या महासुयाॅची प्रखर किरणे भारतभूमीला प्रज्वलित करत गेली.


       त्यांच्या कायाॅची महती माझ्यासारखा सामान्य माणूस काय रेखाटणार. पण जिथून मी उभा राहिलो, बी.ए. प्रथम वषाॅत मी वक्तृत्व स्पधॅत जेव्हा भाग घेतला. संपुर्ण कॅरीडोर प्रेक्षकांनी भरला होता. पाय प्रेक्षकांसमोर उभे राहुन थरथरत होते. पण सुयाॅची सकाळची सकारात्मक किरण चेहर्‍यावर पडली आणि मी बाबासाहेबांवर बोलायला सुरुवात केली. विषय होता," सार्वत्रिक जीवनात शिक्षणाचे महत्त्व. "


       " सुयॅउदय झाल्यावर जे मजुर कामावर उपाश्यापोटी पोटाची खळगी भरण्यासाठी घरापासून दुर कामासाठी बायाभाभडे निघतात त्यांना आज शिक्षणाची गरज आहे."

       असे पहिले वाक्य उच्चारताच टाळ्यांचा गडगडाट झाला.आणि माझ्या वाणीत अचानक जोर आला. आत्मबल माझे वाढले , मी समोर बोलत गेलो आणि प्रथम क्रमांक घेऊन सवाॅनी माझी पाट थोपटली. ती माझी साहित्यातली पहिली achivement होती.

          मग मी पुढे-पुढे चालत गेलो मला प्रेरणा मिळत गेली. 

        बाबासाहेबांनी सवॅ समाजाला समता,बंधुत्व व प्रेमाची शिकवण दिली. शिका, संघटित व्हा, व संघषॅ करा हे त्यांचे मुल स्त्रोत होते. सगळ्यात जास्त विषयात पदवी घेणारे ते एकमेव भारतीय होते. 

      त्यांनी आपले संपुर्ण जीवन दिनदलित, पददलित, अशिक्षित लोकांना न्याय व अधिकार मिळवून देण्यासाठी अ‍पॅण केले.

      त्यांच्या कायाॅची महती फार मोठी आहे.

तो उजेडाचा दिवा, तो एक अन्यायाविरुद्ध लढणारा महासागर, महामानव होता.

     त्यांचे स्मरण फक्त १४ ऑक्टोबर ६ डिसेंबर आणि धम्मचक्र दिनाच्या दिवशीच न करता, त्यांच्या कायाॅची अखंडज्योत सदैव आपल्या जीवनात तेवत राहु द्या.


           बाबासाहेबांना दलित लोक देव का मानतात

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~



बाबासाहेब हे देशातील असे व्यक्ती होते ,ज्यांनी स्वतःच गरिबीत दिवस काढुन रस्त्यावरील विद्युत खांबांच्या उजेडात बसुन अभ्यास करुन उच्च शिक्षण घेतले.


    त्यांनी अथॅशास्त्र, राजशास्त्र,कायदा, गणित या सवॅ विषयात उच्चस्तरीय शिक्षण घेऊन देशासमोर एक मिसाल कायम केली.


ते एक अथॅशास्त्रज्ञ होते, त्यांना राजकारणाचे ज्ञान अवगत होते. ते गणितीय शास्त्र समजत होते.


त्यांनी जीवनात शिका, संघषॅ करा व संघटित व्हा. हे तीन मुलमंत्र पददलित समाजाला दिले. समता, बंधुत्व व अन्याविरुध्द लढा द्या. ही शिकवण बाबासाहेबांनी सवॅ गरीब बांधवांना दिली.


    पिढी दरपिढी देशातील खालच्या जातीवर होत असलेला अन्याय व अत्याचार ती भोळीभाभळी जनता अशिक्षित असल्यामुळेच होत आहे. या गरीबीच्या व अशिक्षिततेच्या चिखलात फसलेल्या दलित बंधुंना बाहेर काढल्याशिवाय यांचा विकास होणार याचा विचार त्या महामानवाने केला. 


त्या सवाॅना संघटित करुन त्यांना शिक्षणाचे , ज्ञानाचे, पुस्तकाचे जीवनात किती महत्व आहे हे पटवून दिले.


त्यांना अज्ञानाच्या दलदलीतुन बाहेर काढले ,म्हणुनच आजच्या घडीला............ कोणताही महार,मांग, आदीवासी, गोंड, धोबी, चांभार ,सुतार,शिल्पकार, गारुडी,मांग हे खालच्या जातीचे लोक खालच्या जातीचे नाहित ,उच्चशिक्षित आहे, उच्चपदावर आहे,सरकारी नौकरीत आहे, डाॅक्टर, वकिल, इंजिनिअर आहे. 


     हे फक्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहे. जगातला डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पहिला भारतीय व्यक्ती आहे जो सवॅच विषयात उच्चशिक्षित आहे. 


     आज कोणताही दलित धम्मचक्र प्रवर्तन दिवशी ,६ डिसेंबर, १४ एप्रिल, १४ ऑक्टोबर वा दसऱ्याच्या दिवशी दिक्षाभुमीवर येवो.



माय gallery 


तो बाबासाहेबांची एक फोटो आणि कमीत कमी एक फोटो तरी सोबत नेल्याशिवाय राहत नाही. कारण या देवमाणूसाने बोट दाखवून शिक्षणाची नवी दिशा दलितांना दाखवून नवा मागॅ दाखविला.



म्हणुन या महामानवाला सवॅ दलित देव मानतात. अस्पृश्यतेचा ठप्पा दलितांवरचा काढून बाबासाहेबांनी राज्याची घटना समिती लिहली.




अशा या थोर महामानवाला माझा त्रिवार नमस्कार 🙏🙏🙏🙏




मोहन सोमलकर 🙏🙏🙏🙏🙏

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...