मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

सोमवार, १ नोव्हेंबर, २०२१

अलक ....मोबाईल

 मोबाईल 


My gallery 

मी मोबाईल आहे. गेल्या दोन वषाॅपासुन आणि आता एकदोन महिन्यात मी प्रतिलिपी,शब्दलेखणी, काव्यपुष्प, साहित्य पर्वणी यांच्यासह लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहत आहो. आम्ही लेख आणि कविता या दोन मुलामुलींना दत्तक घेतले. 


आणि आता आम्ही आमचे पुवाॅश्रमीचे आयुष्य विसरुन रोज आनंदात शब्द ऐके शब्द करत साहित्य रुपी जीवन जगत आहो.

    

मी माझे आधीचे आयुष्य पुणॅपणे विसरलो.


मला या विश्वात मोठे व्हायचे आहे.



मोहन सोमलकर 🙏😊🪔



वसुबारस, आठवली कामधेनू लक्ष्मी

 

From My gallery 

वसुबारस

वात्सल्य, प्रेम,जिव्हाळा होता

बाबांना गाईबद्दल मनात रुजलेला

कुत्रे,मांजरी पाळण्यापेक्षा 

गाईच्या घुंगराचा आवाज मनी भिणलेला


आणली होती गाय गावाहून 

पांढरीशुभ्र नाव तिचे लक्ष्मी होते.!

डोळे तिचे पाणीदार दिसायचे

ती आली तशी शेण , दुधदुभत्याचे कमी नव्हते..!


पहाट झाली रोज की, 

गळ्यातील घंटेचा आवाज दुमदुमायचा

तिच्या त्या श्वासाने,तिच्या असल्याने 

सुख,शांती,मांगल्याचा नेहमीच झरा वाहायचा.!


सकाळी शेण उचलणे, तिच्यासाठी बाटा करणे

( गवत ,चुनीढेप, तिचे जेवण देणे)

लहानभावासोबत तिचे दुध काढणे 

तिला पिरसवणे हे नित्याने करायचो

मग काढलेले दुध सारी भावंडे प्यायचो.!


मग दिवसभर ती बाहेर चरायला 

आपल्या शाळेत तॄण खायला जायची

आम्हीही तिच्याशी बिछडुन 

आपल्या शाळेत जायचो.....!



जसजशे आम्ही मोठे होत गेलो

जबाबदारी वाढत गेली, आम्ही गुंतंत गेलो

शहरातील आमच्या रहदारी वाढत गेली

तिला दिवसभर बाहेर सोडवायला जागा कमी पडली


तिने उपकार आम्हावर एवढे केले

तिच्या असेपर्यंत तिने आम्हांला चारपाच वासरु दिले

सदैव अंगणी आमच्या रोज तिच्यामुळे शेणाचा सडा पडत होता

दुध दुबत्याचा साठा घरात कधीच कमी पडत नव्हता.!


आमची ती कामधेनु लक्ष्मी मांगल्याची प्रतिक होती.

तिच्या दारात गोठ्यात असल्याने सुख, समृध्दीची हवा दरवळत होती.

दिवसेंदिवस शहरात सिमेंटची जंगले वाढली.

गुरे चारायला मोकळी मैदाने व वैरण कुठे राहिली.!


तिच्या पायाच्या खुरांना ही सिमेंटची रस्ते टोचत होती

प्रदुषणाच्या या वातावरणी तिची श्वासाची गती थांबत होती..

आम्हीही आता अभ्यासात भांवडे गुंतत गेलो..!

तिच्याकडे लक्ष द्यायला व तिची काळजी घ्यायला रिकामे नाही उरलो..!


बाबांनी कंटाळुन मग गावाला तिला परत पाठविले.!

मग आम्ही सारे तिच्या प्रेमासाठी मुकलो

दर दिवाळीला वसुबारसेला लक्ष्मीची आठवण करतो

एक पुरणपोळी नैवद्याची तिच्यासाठी काढुन

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...