मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१

लग्न वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

My gallery 



 प्रितीताई व श्री. अनिरुद्धजीला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेछा

जीवनाच्या धावपळीत 

रोज रममान असतो

नुसते धावत असतो

कुठे स्वतःकडे बघण्याचा

वेळ असतो..!


पण असतो जीवनसाथी

आपली काळजी घेणारा

आपल्याला आनंदात 

असतो तो सदैव पाहणारा!


हातात हात घेऊन 

आपण रोजचे जीवन जगतो

डोंगर जीवनाचा

त्याच्या सहकार्याने पार करतो.!


नाते असते ते मृदु मनाचे

फुललेल्या फुलाप्रमाणे

अगणित चकाकणार्या 

चांदण्याप्रमाणे..!


प्रितीताई व अनिरुद्धजीला 

लग्न वाढदिवसानिमित्त हार्दिक 

शुभेच्छा..!

शुभेच्छुक 

मोहन सोमलकर व काव्यपुष्प परिवार  नागपूर 

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

गझलसम्राज्ञी ,स्त्रीशक्ती एक आकलन

 आजचा माझ्या लेखाचा विषय आहे 

‼️गझलसम्राज्ञी,स्त्रीशक्ती एक आकलन‼️

My gallery 


प्रतिलिपीवर वा काव्यपुष्प या ब्लाॅग निर्मित समुहावर मी खुप दिवसांपासुन एक आकलन करतो की बरेच लोक सवॅच प्रकारात उत्तम लेखन करतात, ते लिखाण खुप सुंदर व मनोरंजन पर असते. नविन लोकांच्या हातुन चुका झाल्या तरी जेष्ठ साहित्यिक त्यांना मार्गदर्शन करुन सांभाळून घेतात. हे इथे कौतुकास्पद आहे.

तर प्रत्येक जण इथे वेगवेगळ्या काव्य प्रकारात लिखाण करतात. पण "  मराठी गझल"हा काव्यप्रकार मला खुपच किचकट आणि गुंतागुंतीचा वाटतो. पण जे लोक प्रतिलिपीवर व काव्यपुष्पावर उत्तम प्रकारे मराठीतून नियमबद्ध "गझल प्रकार " लिहतात. ते लोक फार कमी आहेत. व जे आहेत ते" काबिलेतारिफ "आहेत. 


विशेष म्हणजे त्या पाचही स्त्रियाच आहेत, हे एक कौतुकास्पद आहे. अशा या कठिण  व किचकट काव्यप्रकारचे  आपल्या गुरु मार्फत योग्य ते नियमबद्ध मार्गदर्शन घेऊन  मराठी गझल हा काव्य प्रकार शिकून अगदी सरळ व सोप्या पद्धतीने त्या गझल वाचकांसमोर आणून या पाचही गझलसम्राज्ञींनी  वाचक लोकांवर एक प्रकारचे उपकारच केले असे समजावे.


मित्रहो.! व माझ्या वाचकांनो या पाच गझलसम्राज्ञी कोण आहेत , याचे तुम्हाला प्रत्येकालाच असे कुतुहल लागले असेल. 



मित्रहो त्या गझल सम्राज्ञी दुसऱ्या तिसर्या कोणी नसुन तुमच्या आमच्यातीलच आपल्याच सहकवियत्री आहेत. मनाने आणि स्वभावाने त्या प्रेमळ ,मार्गदर्शक, सहकार्यी आहेत.



साहित्य क्षेत्रात, समाजात, कौटुंबिक क्षेत्रात  एक स्त्री म्हणुन  वेगळेच स्थान आहे,बहुमान आहे. त्या सह्दयी  ,मार्गदर्शक आहेत .


पुढिल पाच गझलसम्राज्ञी ह्या आपआपल्या ठिकाणी उत्कृष्ट गझल लिहणार्या एक कवियत्री आहेत. 


मी या पाचही गझलसम्राज्ञीची एकमेकीशी कोणतीही तुलना करणार नाही. कोण श्रेष्ठ  व कोण कनिष्ठ हे ठरविणारा मी खुप मोठा साहित्यिक नाही. 


या पाचही गझलसम्राज्ञीचे माझ्या मनातील स्थान हे आदरणीय  व उच्चकोटीचे आहे. मी या लेखात त्यांचा बहुमान  एक गझलसम्राज्ञी म्हणुन करत आहो ,त्यांची एकमेकीशी तुलना म्हणुन  नाही. 


   तसेच मी एक गोष्ट सांगु  इच्छितो की, पाचक्रमात कोणालाही पुढे मागे व्हावेच लागेल , त्याबद्दल त्या समंजस पणा घेतील हे मी समजतो. सवॅच कवियत्री मला एकसमान आहेत. आणि प्रत्येकीचे एक आगळेवेगळे स्थान आहे. तर बघा कोण आहेत त्या पाच गझलसम्राज्ञी.!


या पाच गझलसम्राज्ञीचा आपल्या लेखातून फक्त बहुमान करावे असे मला वाटले, त्यांची तुलना मी एकमेकीशी करणार नाही.

त्या पुढिलप्रमाणे आहे.


‼️एड. रुपाली सांवत मॅम

‼️सौ. प्रियंका व्ही. घोडके मॅम 

‼️सौ. वृषाली जोशी ताई

‼️सौ. वंदना सोरते मॅम

‼️सौ. राजश्रीताई जाधव



या पाचही कवियत्री ( गझलसम्राज्ञी) बाकीही काव्यप्रकारात उत्तम कविता लिहितात.

त्यांची लेखणी उत्तम, बहुमानकरणारी, तेज प्रकटणारी, माया,ममता, वात्सल्य,शक्ती, आपुलकी,प्रेरणा,गुणगौरव प्रगटणारी आहे. त्यांच्या लेखणीला माझा नम्र प्रणाम!

🙏‼️🙏‼️🙏‼️🙏‼️🙏

सर्व प्रथम प्रस्तुत करतो 

Adv.  रुपाली सावंत मॅम (रुही)





रुपाली सांवत मॅम यांना माझा प्रणाम 

🙏‼️🙏‼️🙏‼️🙏‼️🙏‼️


‼️तेजस्वीनी तु तेज वाहिनी बुध्दीमंत तु एक तेज लेखणी..!‼️


सदा आपल्या कवितेतून, आपल्या गझलेतुन शब्दाचे तेज झळकविणारी,तेजस्वी शब्दरुपी तलवार अलवार पणे घेऊन येणारी, कधी ममतामयी वात्सल्य प्रगटवणारी ही गझलसम्राज्ञी आपल्या गझलेतुन ,कवितेतून नेहमीच वेळात वेळ काढून  प्रगट होत असते. 

ते आपले घर, वकिली पेशा आणि साहित्याचे क्षेत्र योग्य सांभाळूनच.अशा या कवियत्रीला व गझलसम्राज्ञीला माझा मानाचा नमस्कार‼️

त्यांच्या गझलेचा आस्वाद घ्या..👇

‼️🔅‼️🔅‼️🔅‼️🔅‼️🔅‼️🔅‼️🔅‼️

वृत्त - कालगंगा


कल 


सूर्य माझ्या जीवनाचा मावळाया लागला

हा विचारच या मनाला का छळाया लागला


लोढणे या स्पंदनाचे का उरावर पेलले 

या रुपाचा कल कधीचा बघ ढळाया लागला 


का उराची गत अशी ही कंप सुटतो कापता 

रोज माझा प्राण थोडा का गळाया लागला 


पैलतीरी गाव दुसरा काय लेखी धाडतो 

दूत होता तो निरोप्या मज कळाया लागला


दोष हटता शूभ्र काही या रुहीने जाणले

स्फटिक शुद्धा धवल आत्मा का मळाया लागला


आज देवा मज गवसले गूढ माझ्या अंतरीचे

खेद तोवर देह सरसर बघ जळाया लागला✍️


ऍड. रुपाली सावंत, मुंबई.


बघा निसर्गदत्त देणगी लाभलेली, साहित्याची प्रतिभा लाभलेली

अशी ही एक तेज  स्त्रीशक्ती तलवार ,अलवार अशीच सदैव अग्नी,पॄथ्वी,आकाश,वायु,पाणी या पंचभुताच्या साक्षीने चमकत राहो..!

माझा सदैव यांना हार्दिक शुभेच्छा.!

‼️🙏‼️🙏‼️🙏‼️🙏‼️🙏


दुसऱ्या गझलसम्राज्ञी

सौ. प्रियंका व्ही घोडके मॅम 

🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅

यांना माझा सस्नेह प्रणाम.!



प्रतिलिपीवरील माझ्या दोन वषाॅच्या कालखंडात बरेच लोक माझ्या वाचनात आले , प्रतिलिपीवर लिहिता लिहिता एकदा अचानक ताईची भेट झाली ,भेट म्हणजे प्रतिलिपीवर ओळख झाली, शब्दलेखणीबद्दल कळले ,शब्दलेखणी या समुहाशी मी संलग्न झालो , आज मला बराच मोठा वाचकवर्ग व चाहतावर्ग सचिन सर व प्रियामॅम मुळे मिळाला, त्यांचे मनःपुर्वक आभार‼️🙏


प्रियामॅम बद्दल काय सांगावे, सदा प्रफुल्लित असणार्‍या  सवॅ काव्यप्रकाराच्या जाणकार, उत्कृष्ट कवियत्री, लेखक , गॄहिणी, working women बाहेरचे व कौटुंबिक जग योग्य प्रकारे सांभाळून आपले साहित्य क्षेत्र त्यांनी चोखपणे सांभाळले. शब्दलेखणीसाठी व काव्यसंग्रह प्रकाशित करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेणार्या निष्ठावंत प्रियामॅम शब्दलेखणी या परिवाराच्या "backbone" पाठीचा कणा आहे.

त्यांना माझा प्रणाम ‼️🙏🌷


प्रस्तुत त्यांची गझल 👇

‼️🌷‼️🌷‼️🌷‼️🌷‼️🌷👇

ह्या महागाईत सांगा मी कुणाला दान देऊ

जीवनी ह्या रोज थोडा माणसांना मान देऊ


पोरके केले घराशी पावसाने आज काही

घाव सारे भोगणाऱ्या कोणते अस्मान देऊ


वाटते द्यावे जरासे ओंजळीने रोज थोडे

वादळाना रोखन्याला कोणते रे स्थान देऊ


शासनाने तातडीने काम घ्यावे आज हाती

सोसणाऱ्या जीवनी ह्या तो जरा सन्मान देऊ


वाचला तो जीव आहे का तरीही भोगतो रे

वाटते मी त्याच हाती प्रेम त्याला वान देऊ


प्रिया...


बघा ,वाचा प्रियामॅम किती अलवार पणे कवितेतून व्यक्त झाल्या ,कधीही त्यांनी आपले प्रोब्लेम सांगितले नाही,कधीही कोणत्याही काव्य प्रकाराबद्दल विचारले की त्या योग्यरित्या समजुन सांगतात. 

पुढील वाटचालीत माझा त्यांना शुभ आशिर्वाद व खुप प्रगतीपथावर त्या जावो ह्याच शुभेच्छा.!🙏🙏🙏🙏🙏

‼️🔆‼️🔆‼️🔆🔆‼️‼️🔆‼️🫒‼️🔆‼️🔆‼️


पुढील  गझलसम्राज्ञी  आहे 


सौ वृषालीताई जोशी 



💥💥💥💥💥💥💥💥

सौ. वृषालीताई जोशी यांना मी माझी ताईच मानतो, त्याही मला आदरस्थानी आहेत सहृदय, प्रेमळ, एक आदर्श शिक्षका,गृहिणी,प्रतिभावंत साहित्यिक, सर्वच प्रकारात साहित्य लिहिणार्या, कवितेत शब्दाची उत्तम पकड व जाण असलेल्या ,साहित्य पर्वणी या कवि,कवियत्री समुहाच्या कंट्रोलर  , शब्दलेखणी या शब्दसमूह समुहाच्या आधारस्तंभ अशा आमच्या वृषालीताई  🙏💥कधीही प्रेमळ वाणीने बोलणार्या, चुकले तर समजविणार्या, मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या वृषालीताई यांना माझा मानाचा प्रणाम 🙏🔆🙏🌺🔆🙏


त्यांची गझल बघा👇

वृत्त:- व्योमगंगा

लगावली:- गालगागा गालगागा गालगागा गालगागा


चांदण्यांच्या सोबतीला चांदव्याला मान आहे

एकल्या त्या यामिनीला एवढे ते भान आहे


गुंतलेले अंतरीचे दाट होती भाव वेडे

बांधलेले पाश सारे बंधनांचे रान आहे


गारवा हा या मनाला सूर देई साज देई

माळरानी प्रेमरंगी रंगते हे गान आहे


कोवळ्या या किरणजाली बंध बांधी सावली ही

मुक्ततेला भावबंधी विहरण्याचे दान आहे


अंगणी या मोगरा हा परिमळे का धुंद होई

गंधलेल्या या क्षणाला चुंबनांचे वाण आहे


सौ. वृषाली निलेश जोशी

🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆

कशी वाटली तुम्हाला ताईची गझल  आनंद दिला की नाही.  वॄषाली ताईच्या गझलेत आणि कोणत्याही काव्यप्रकारात एक वेगळ्याच प्रकारची अनुभुती व आनंद वाचकाला होते. व वाचक मंत्रमुग्ध होऊन वृषालीताईचे काव्य वाचन करतो. नियमावलीत बसणार्या त्यांचा गझल असतात.


त्यांच्या पुढील लिखाणासाठी माझ्यातफॅ अनेक हार्दिक शुभेच्छा.!


ताईला माझा सप्रेम नमस्कार 🙏‼️‼️🙏😊🙏‼️🙏😊‼️


पुढील गझलसम्राज्ञी 

‼️🙏सौ. वंदनामॅम सोरते.




🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷

वंदनामॅम ला माझा सप्रेम नमस्कार 🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏

वंदनामॅम बद्दल काय बोलावे, त्यांच्या सारखी साहित्यासाठी मेहनत कोणी घेतली नसावी. रोज प्रतिलिपीवर दिलेल्या विषयानुरुप खुपच छान कविता रचतात, त्या प्रत्येक कविता एवढ्या सुंदर असतात की, प्रत्येक वाचकाचे मन मोहून जाते. 


रोज विषयानुरुप लिखाण त्या सवॅच श्रेणीत करुन प्रत्येक श्रेणीतुन त्या प्रथम क्रमांकावर येतात. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यांना कवितेतला गझल प्रकार येत नव्हता. पण आदरणीय येवलासरांकडुन त्यांनी शिकुन घेतला. व आज त्या गझल खुपच उत्कृष्ट लिहतात. आतापर्यंत त्याच्या गझल १०० च्या आकड्यात पोहचल्या आहे.

वंदनामॅमची गझल वाचा.👇

गझल..!🌻

🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆

आयुष्याच्या प्रांगणी मी हरत गेले...

.जीवनाचे गणित माझे सरत गेले! 


भेद हेची जाणले का कोणी...

आयुष्य हे जलसमानच तरत गेले


..सोडवून मी बघत आहे कोडे..

..व्याज सारे भांडवल ही परत गेले..


..सुटत नाही गणित हेची जीवनाचे.!...

..प्रश्नच माझ्या मी मनाशी करत गेले...


. साधले ना मांडलेले तीक्ष्णच दावे..!.

फसवूनी त्या मृगजळी मी हरत गेले गेले...


.....मंजूघोषा काव्य.....


लगावली:- गालगागा गालगागा गालगागा...

रदिफ:- गेले........

काफिया:- हरत सरत,परत,करत,हरत..


..शब्दशिल्पी" वंदू"..........(..वंदना सोरते"

काव्यसमाज्ञी")


रोजच विषयानुरुप त्या एक गझल लिहितात, आणि प्रत्येक प्रकारात त्यांची रचना प्रतिलिपीवर सजते, बालसाहित्य ही श्रेणी त्यांची आवडती श्रेणी ! आणि वेळात वेळ काढून त्या गझल या प्रकारात  लिहितात. 



पुढेही अशीच साहित्यात प्रगती करीत राहाव्या व आपल्या साहित्याची पातळी वाढवित राहाव्या..! ह्याच त्यांना माझ्या तफॅ शुभेच्छा.!


🔅🌷🔅🌷🔅🌷🔅🌷🔅🌷🔅🌷


यानंतरच्या गझलसम्राज्ञी पुढिल प्रमाणे


‼️सौ. राजश्रीताई जाधव 🙏



राजश्रीताईना माझा नमस्कार, 🙏

राजश्रीताई  बरेच दिवसापासून प्रतिलिपीवर साहित्य लिहितात, त्यांच्या कविता ,लेख खुप छान असतात. त्या आमच्या काव्यपुष्पावर कविता, लेख फारच सुंदर लिहितात. स्वभावाने उत्तम व्यक्ती असुन, त्यांनी आपल्या कविता लिहण्याचा छंद उत्तम रित्या जोपासला आहे. 


त्यांनी गझल लिहायला आता ,आता सुरुवात केली ,परंतु त्यांच्या " गझल" वाचल्या की, तो नविन पणा जाणवत नाही. 


दुसर्याचे साहित्य प्रतिलिपीवर व काव्यपुष्पावर वाचन करुन त्यांना समिक्षा देऊन साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचे काम त्या नेहमीच करतात.

त्यांची गाजलेली गझल पुढिल प्रमाणे👇

वृत्त :- महामाया , लगावली :- लगागागा लगागागा 

जिभेला धार ही आहे 

कराया वार ही आहे 


दुःखाचे भोग भोगावे 

सुखाला पार ही आहे 


नसावा त्रास कोणाला 

खरा तो सार ही आहे 


मनाचे सूर लागेना 

जुळेना तार ही आहे  


नसे  आधार कोणाचा 

सदा का भार ही आहे  


सौ. राजश्री सुहास जाधव.


किती सुंदर रित्या राजश्रीताईने आपल्या मनातले भाव या गझलेत प्रगट केले आहे. एका कविला, कवियत्रीला ,लेखक., लेखिकेला कविता अथवा कथा, लेख लिहतांना आपला जीव ओतावा लागतो, आपल्या प्रतिभेचा कस लावावा लागतो, शब्दाचा शब्दकोश, भावना रित्या कराव्या लागतात. 


पण वाचक त्याची पर्वा करित नाही. कोणी वाचुन समिक्षा दोन शब्दाची न देताच निघुन जातात. 

म्हणुनच मग लेखकाच्या मनात निराशा उत्पन्न होते. बरे असो.


वरील लेख मी " गझलसम्राज्ञी" म्हणुन या पाचही स्त्रिशक्तीचा गुणगौरव माझ्या लेखणीतून करण्याचा एक छोटासा कयास केला. हा लेख मी आपल्या मर्जीने या पाचही व्यक्तींच्या सहमतीने लिहलेला आहे. 


हा लेख लिहितांनी मी कुठलेही साहित्य चोरलेले नाही. प्रत्येकीच्या गझल ह्या त्यांच्या नावाखाली दिलेल्या आहे. त्या त्यांच्या स्वरचित  आहे. 


त्या त्यांच्या परवानगीनेच लेखात टाकलेल्या आहे. प्रत्येक गझलसम्राज्ञी मला आदरस्थानी आहेत. एका गुरूच्या ठिकाणी आहे.

हा लेख म्हणजे त्यांची एकमेकींशी केलेली तुलना नव्हे. 

प्रत्येकीचे एक आगळेवेगळे आपल्या साहित्य क्षेत्रात  स्थान  आहे.


तेव्हा कोणाला राग नाही लोभ नाही.🙏😊😊🙏

पुढिल यशासाठी पाचही कवियत्रीला अनेक अनेक शुभेच्छा.!


लेखक 

मोहन सोमलकर 

🙏😊🙏😊🙏

©️®️

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...