मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

मंगळवार, १८ जानेवारी, २०२२

तिळगुळ ....एक आकलन

 


तिळगुळ......एक चिंतन

तिळाच्या भेटिला गुळ यायचा

तिचा साजशृंगार मकरसंक्रांतीत दिसायचा 

सारे सण आम्ही साजरे करायचो

वर्षाचा शेवटही आनंदात व्हायचा..!


सुखदुःखाचे नाते जीवनात 

उनसावली सारखे वाटे

कोणा परक्यालाही वेदना झाल्या तरी

अंतःकरण अश्रुनेच आपलेच दाटे..!


आले कसे हे महामारीचे सावट

कोणी रचला असेल बरे हा कट

कोणी कोणासाठी नाही करत वटवट

आपल्याच घरी बसा ही जगण्याची उरली अट.!


आनंदाच्या सरी कधी बरे येईल

हसतमुखाने,आणि निर्भयतेने कधी आयुष्य जगु

आपलेच आयुष्य आपण कधीपर्यंत 

देवाला असे आमिष दाखवुन कितीदा मागु..!


नाही कुठे जाता येत, नाही कुठे फिरता येत

एक एक दिवस सरुन वर्ष पुढे चालले

कोणते सण ,कोणते महोत्सव आहेत

सारेच कसे भारताची संस्कृतीत विसरत चालले.!


तीळात मिसळतो गुळ मग येतो खाण्यात गोडवा

अहो, पोळ्याचा,होळीचा,दिवाळीचा विसरलो पाडवा

आता ऑक्सिजन कमी पडत आहे....!

आतातरी जागे व्हा आया,बहिणीनो, बापांनो ,भावांनो पाणी अडवा.!



मोहन सोमलकर 🙏😊👍

मैत्रीच नातं

 


जसा गरम गरम वरणभातावर

गरम गरम तुप टाकुन 

करतो कालवाकालव 

तशी मैतरीची होते हालवाहालव 


जशी विरघळून जाते दुधामंदी साखर 

जशी लागै गोड चटणी सोबत भाकर 

मग  भरल्या पोटावरुन 

समाधानाची देतो आपण ढेकर..!


सारे नौकर चाकर मिळुन मिसळुन 

करतात कष्ट खुप 

धंद्यात होतो असा नफा

येते सर्वास हुरूप.....!


तसेच टिकवून ठेवा खऱ्या मैत्रीचं नातं

जसे चमके मान्यामंदी तलवारीचं पातं..!



मोहन सोमलकर 

Copyright 

/^=^=^=^/



ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...