●उन्हाळी सुट्टी निमित्त काव्यलेखन स्पर्धा●
□साहित्यिकांच्या हक्काचे व्यासपीठ..□
============/@/===============÷÷
विषय* - *सुट्टीतील आठवण*
शिर्षक:- " आनंद जीवनातला"
आठवते मज माझे बालपण
शिस्तबद्ध व खेळण्यात रमणारे होते मन
वर्षभर चालायची शाळा व अभ्यास
आला उन्हाळा की यायचे आनंदी क्षण ॥१॥
त्या अभ्यासाच्या व शाळेच्या ताणातून मोकळे व्हायचो
संपताच परीक्षा लागल्या सुट्ट्या की आनंदी व्हायचो
मग ओढ लागायची मामाच्या गावी जायची
तिथल्या निसर्गात रमुन आनंद उपभोगायचो..॥२॥
ते गतजन्मीचे दिवस अजुनही आठवतात
गीत मनात सुखावून मग जातात
पुन्हा ते दिवस परत ना यायचे
बालपण ते आठवुन डोळ्यात अश्रु येतात..॥३॥
आता जग आहे बदलले सारे
बालपण मुलांचे हरवले ताणतणावात
अभ्यासाचे मोठे ओझे मुलांवर लादले जाते
वेदना मुलांच्या मनाच्या राहतो आपण पहात ॥४॥
आपल्या इच्छा व आकांक्षा आपण मुलावर लादतो
आपली स्वप्ने त्याच्यातुन पुरे करत असतो
आनंद जीवनाचा त्यांचा हिरावून घेतो
उन्हाळ्यातल्या सुट्टीतही अभ्यासाच्या घाणीला जुंपतो.॥५॥
म्हणुन मुलांचे बालपण आपणच करतो बंदिस्त
उन्हाळ्यातल्या सुट्टीचाही होतो अस्त
नका मुलांच्या डोक्यावर ताण देऊ जास्त
त्यांचे बालपण नका करे असे उध्वस्त..!
मोहन सोमलकर

