हिन्दी चित्रपट सृष्टीतील भारतकुमार म्हणजेच" मनोजकुमार " ने" जय जवान व जय किसान " हा नारा लावुन" उपकार " चित्रपट बनवला. तसेच भारताचे पुवॅ प्रधानमंत्री स्व. लालबहादूर शास्त्री यांनी सुद्धा "जयजवान आणि जयकिसान" हा नारा लावला. त्यांना प्रेरित होऊन ही कविता गीतासारखी वाचावी...!
"जय जवान जय किसान "
________🌾🌿👷_____
काळी आई ! ओ काळी आई!!
तुझ्या काळजातुनि तिफन चाले
काळीज माझे हाले....
काळी आई!ओ काळी आई..!!
तुझ्याच माथ्यावरुनि उगवे सुयाॅचा टिळा
सुई सुई आवाज करुनि वाहे वारा हा खुळा!!
मातेला रक्षया उभा सैनिक रात्रंदिन देई पहारा
गोळ्या झेलुनि छातीवरी सोसल्या शत्रुचामारा
तिफन चालते मातीतुनि धन्य झाली ती माता
काळ्या आईचे कजॅ फेडुनि उंच झाला माथा
फुटले पाय पडल्या भेगा सांडले त्याचे रक्त
भेगावरती माती लाविली जणु माईचा भक्त
जन्मदात्री आई बोलली कुस माझी अजुनि
फुलु दे.. पुन्हा उदरातुनि किसान जन्मु दे.
या लक्ष्मी जन्मुदे ..!!
भाकर भेटली, भाजी भेटली, कडधान्ये भेटले
काळ्या मातीत मेघ बरसुनि लक्ष्मीच्या गळ्यातले माझ्या मोती भेटले...!!
तरीही या काळ्या मातीला मी दुर लोटले....!!
🌳🌿🌾🍃🍁🌹🌸🍀🌱🌵🌴🌳
काळीज फाटते रक्त आटते सनकतो माथा
पहिल्या थॆंबात बी टाकले तरी पिक ना उरे आता. .!!
लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त पुन्हा प्रकाशित ही कविता🙏🙏🙏शास्त्रीजींना अभिवादन करुया...!
मोहन सोमलकर 🙏🙏🙏🌺🌺🌺

अप्रतिम सुंदर 👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना केली सर 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना केली
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना खूपचं सुंदर लिहिले आहे
उत्तर द्याहटवाजय जवान जय किसान