My gallery
मिडिया एक चक्रव्यूह आहे,नव्या आधुनिक काळातलं, जे आपल्या पाच इंद्रियांवर प्रभुत्व गाजवत आहे, हे आभासी जग, हा मोहमायेचा विळखा , हे गुरफटत जाणे त्यातल्या त्यात, आणि खरे आयुष्य जगणे विसरुन जाणे होय.
डोळे,मन, ह्दय, हात,आणि मेंदु या पाच ज्ञानेद्रियावर या वाईट मिडीयारुपी चक्रव्यूहाने आज प्रभुत्व मिळविले आहे.
त्यामुळेच आपण खरे आयुष्य विसरुन मोबाईल नावाच्या व्यसनाच्या अधीन झालो आहोत. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत चक्रव्यूहात सारेच फसले. या गेलेल्या पाच वषाॅत या चक्रव्यूहाची व्याप्ती वाढली.
दुरुपयोग तसे सदुपयोग पण आहे मोबाईलचे पण आपल्यासारखे रात्ररात्र जागुन बिनाकामाने या व्यसनाच्या आधीन झालो.
मग हजारो रोगाप्रमाणे विभिन्न ग्रुप च्या स्वाधिन झालो.
त्यातील मग मेंबर्स चे पर्सनल अकाउंट, अजुन पोट समुह किती आणि किती ग्रुप हे सहन करणार. फक्त एकटा माणुस, त्याचा एकटा मेंदु आणि हजारो वाटसअप ग्रुप..!
त्यापेक्षा एकांत बरा, हा एकांत आता मला हवाहवासा वाटत आहे. माझ्या भरवशावर कित्येक लोक आहेत ,मला कित्येकांनी गुरफटून ठेवलं आहे.पण स्व हितासाठी व स्वतः च्या इच्छेने जगण्यासाठी एकांत वास जवळ करुन गोंगाटातुन अलिप्त राहणे गरजेचे आहे..!
ओम नमो शिवाय
तुझे सेवेत लवकरच येईल,शंभो🙏🙏🙏🙏🙏
मोहन सोमलकर 🙏🙏🙏🙏
वास्तविक
उत्तर द्याहटवाधन्यवाद तुषार 🙏
हटवाअप्रतिमच लिहिलंय मोहन दा तुम्ही 🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाधन्यवाद दादा
हटवाखरी वास्तविकता खूप छान लिहले सर
उत्तर द्याहटवावास्तवता दाखवली आहे....सुंदर लेख..👍✍️🍫👌
उत्तर द्याहटवा