मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

प्रजासत्ताक दिन

 


नुसते १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला

देशाचे स्मरण करुन कृतज्ञता व्यक्त करु नका

देशासाठी जगा,समाजहित मनात जागवा

स्वाभिमान तिरंग्यासाठी आयुष्यभर जागवा.!


कित्येक समाजसेवक, क्रांतिवीर, देशसेवक 

आपला श्वास, आपले शरिर आपले सर्वस्व 

या भारतमातेवर अर्पण करुन अजरामर झाले

लावले पिटाळून इंग्रजांना, त्यांच्यावर केले वर्चस्व! 


विर सैनिकांनी,विर शिपायांनी दिली प्राणाची आहुती 

बाबासाहेब, टिळक, सावरकर, गांधीजीची देशसेवा होती

ज्यांनी भारतभुची माती आपल्या रक्ताने व प्राणाने जपली

वीर मरण सीमेवर पत्कारुनी सैनिकांनमुळे मातृभुमी श्रृंखलेतुन मुक्त झाली होती!


एक दिवस फक्त डिपीवर तिरंगा ठेवून देशभक्ती नाही होत

कित्येक शहिदांनी दहादिशातुन प्राणाची लावली ज्योत 

आठवण तयांची समाजसेवा करुन रोज करा..

आयाबहिणाचा मान करा ,नित्यरोज त्याही आपल्या भगिनी होत.!


जयभारत देशा, मंगलदेशा.!

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

मोहन सोमलकर 

©️®️


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...