नागपूरचेच आम्ही रहिवासी प्रतिलिपीवरच भेट व्हायची
भेट कधी तरी घ्यावी रंजुजीची
मनात सदैव भावना दाटायची.!
पुष्कळदा प्रयत्न केला
योग कधी जुडून आला नाही
आज वेळात वेळ काढला
भेट झाली वेळचे भान राहिले नाही.!
मनसोक्त मारल्या गप्पा
ऊर्मिला ताई आणि त्यांच्या मिस्टरांशी
किती आपुलकी,जिव्हाळा, लळा दाखविला
नाते जुडले भावनेचे ह्दयात शंभर अंशी..!
गप्पाचा टप्पा गाठत गेलो
नुसते तिघेही बोलत राहिलो
मनात एकमेकाप्रति सलोखा वाटला
आयुष्याच्या गप्पात रंगत राहिलो..!
काढला त्यांच्या घरातुनि पाय
डोळ्यात अश्रु आले नाही
तरी अंतःकरण रडु लागले धायमोकळुन
गहिवर फुटे मनास अजुन बोलायची इच्छा पुरी झाली नाही..!
रंजुताईची आज थेटभेट झाली..!
😊😊😊😊🔥😊🙏🙏🙏🍁🍁🍁
मोहन सोमलकर 🙏