वेळ आहे का बोलायला
कधी नसतो वेळ बोलायला
जेवढा तंत्रज्ञानाचा विकास
आयुष्य गुरफटत जाते भोवती
जीवन सवाॅचे झाले भकास
पूर्वीचे जीवन खळखळता झरा होता
सुखदुःखात मनुष्य उभा होता
एकमेकांप्रती सलोखा होता
प्रत्येक जण ह्दयी गोतावळा सांभाळत होता.!
आता माणुसच माणसाचा वैरी झाला.!
एकमेकातला संवाद संपला
जिथे तिथे माणुस मोबाईल मध्ये हरवला.!
नात्यात दुरावा वाढतच गेला.!
सगळेच शाॅटकटच्या मागे धावु लागले
खरे आयुष्य जगणे विसरू लागले
बोलणे एकमेकांशी टाळु लागले
मोबाईल मध्ये तोंड खुपसुन राहु लागले.!
लग्नात,समारंभात पंक्ती उठायच्या.!
थट्टा मस्करी करित पंक्ती वाढायच्या.!
श्लोक जेवणाच्या सुरुवातीला
मस्तपैकी मुखाने मैफिली वदवायच्या.!
चेहरे फुलावाणी बहरायच्या.!
गेली ती गमंत जमंत
गेली सारी थट्टा मस्करी
पारावरची मैफिल गतकाळात विलिन झाली
ती पिढीच आता लुप्त झाली..!
संवादाचे झाले modernisation!
भाऊच भावाशी बोलत नाही
Friend request पाठवुन तो next generation चे पाळतो सारे नियम.!
पिता वयोवृद्ध ते झाले
मुलासोबत संवाद साधायला आतुरलेले
ताटावर बसल्यावर एका हाती टि.व्हीचा रिमोट
दुसर्या हाती मोबाईल धरले
बाप बिचारा केविलवाणा झाला
बोल मनातला हरपुन गेला
जन्म दिला ज्या मुलाला
तो विज्ञानयुगी व्यस्त झाला..!
मोहन सोमलकर 🙏🏼🙏🏼🙏🏼💐
![]() |
| माणुस माणसाला विसरत चालला..! |

