नुसते १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला
देशाचे स्मरण करुन कृतज्ञता व्यक्त करु नका
देशासाठी जगा,समाजहित मनात जागवा
स्वाभिमान तिरंग्यासाठी आयुष्यभर जागवा.!
कित्येक समाजसेवक, क्रांतिवीर, देशसेवक
आपला श्वास, आपले शरिर आपले सर्वस्व
या भारतमातेवर अर्पण करुन अजरामर झाले
लावले पिटाळून इंग्रजांना, त्यांच्यावर केले वर्चस्व!
विर सैनिकांनी,विर शिपायांनी दिली प्राणाची आहुती
बाबासाहेब, टिळक, सावरकर, गांधीजीची देशसेवा होती
ज्यांनी भारतभुची माती आपल्या रक्ताने व प्राणाने जपली
वीर मरण सीमेवर पत्कारुनी सैनिकांनमुळे मातृभुमी श्रृंखलेतुन मुक्त झाली होती!
एक दिवस फक्त डिपीवर तिरंगा ठेवून देशभक्ती नाही होत
कित्येक शहिदांनी दहादिशातुन प्राणाची लावली ज्योत
आठवण तयांची समाजसेवा करुन रोज करा..
आयाबहिणाचा मान करा ,नित्यरोज त्याही आपल्या भगिनी होत.!
जयभारत देशा, मंगलदेशा.!
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
मोहन सोमलकर
©️®️