मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

कल्पनाताई चे कल्पनाविश्व

 


कल्पनाविश्व


जुंपुनी शब्दाचे अश्व

सारथ्य ती साहित्या करे

शब्दसाठा तिच्या मनी

ती साहित्य क्षेत्र काबिज करे


मनधरणी तिची कोण करील

विनवणी तिची कोण करिल

ती शब्दमेघ साहित्य नभातली

डोईवर प्रतिभाछत्री कोण धरिल


स्वभाव तिचा बाप्पाची देण

कुणाशी तिला नाही देणघेणं

मायेची कास तिच्या अंगी

प्रेमाचं तिच्या फेडावे कसे ऋण


कल्पनाविश्वात मी रममान झालो

शब्दसागरी तिच्या मी न्हालो

धागे ऋणाबंधाचे मनाशी गुंतवित

सुखीसमाधानी मी झालो..!


असावी जुळलेली गतजन्माची नाळ

आठवत नाही आता मज तो काळ !

नाते स्नेहाचे असावे तिच्याशीच 

रक्ताचे असेल पुर्वी, प्रेमाने भरे आभाळ.!!


लढलो झगडलो असेल कधी

त्याचे यतकिंचितही बुरे न वाटे

स्नेह,वात्सल्य, आपुलकी वाढत गेली

अंतःकरणी दोघांच्या जीव प्रेमाचा दाटे.!!


काटा तिला पायात रुतावा

जीव माझाच हळहळावा

वेदना जरी तिला झाली 

भावाच्याच डोळी अश्रु यावा..!


नाते हे रेशीमबंधाचे

माथ्यावरल्या चंदनगंधाचे

मनीगटी जरी रक्षाबंधनी नाही बांधले

जुडले राहिल सदैव ते मनाचे...!!


कल्पवृक्षरुपी कल्पनाताई 

जणु प्रेमळ ममत्व तिच्या ठायी

बाप्पाचा आशिर्वाद सदा तिच्या शिरी

सदा ती हर्षाचेच गीत गाई...! 


लेखणीने तिच्या घ्यावी भरारी

शब्दात प्रतिभा आपली उज्ज्वल करावी

साहित्यातुन लिखाण करुनि

प्रगतीची नव वाट चालावी....!!



शुभआशिष असा तिला शुभदिनी द्यावा

आनंदाचा प्रत्येक क्षण साजरा व्हावा

सौख्याने ,आणि समृध्दीने 

अंगणी तिच्या आनंदी पारिजातक फुलावा..!!



मोहन सोमलकर 

गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२

खरी माणुसकी

 


विषय:- माणुसकी दाखविली (लघुकथा)वास्तव 





माणुसकी दाखविली 


उमेश सदन घरचा भरल्या कुटुंबात राहणारा एक व्यक्ती होता. नवराबायको एक मुलगा एक मुलगी उमेशचे आईवडील ,परत त्याचा मोठा भाऊ ,त्याचा परिवार मुले बाळे असे एकाच घरी राहायचे. 


उमेशचे किराण्याचे दुकान होते. रोजच तो आणि त्याचे वडिल किराणा दुकानात राब राब राबून कुटुंबासाठी कष्ट करायचे. त्याचा मोठा भाऊ खाजगी नौकरीत होता. तो त्याच घरी वेगळा राहायचा,पण पारवारिक कार्यक्रम प्रसंगी सगळेच एकत्र यायचे.


अशातच मागल्या वर्षी सार्‍या देशात भयंकर कहर केला होता.

तसा नागपुर शहरातही कोरोना या महामारीचा खुपच कहर होता.


           मोठमोठी खाजगी व सरकारी रुग्णालये कोरोना रुग्णांनी भरलेली होती. नागपुर शहरी एवढे इस्पितळ आहेत, पण एकही इस्पितळ एप्रिल महिन्यात खाली नव्हते.


             रोजच किराणा दुकानात गिर्‍हाईकांशी उमेश चा व त्यांच्या वडिलांचा संपर्क येत असल्यामुळेच आधी उमेश कोरोना पॉझिटिव्ह झाला. तो पंधरा दिवस रुग्णालयात भरती होता. 


            हिमंतीने पुर्ण खचला होता, पैसे खाजगी इस्पितळात भरती असल्यामुळेच भरपूर लागत होते, पण त्याने हिम्मत हारली नाही. विशेष म्हणजे त्याच्या वस्तीतील मित्रांनी या वेळेस खरी माणुसकी दाखविली ,त्याला हिम्मत दिली. त्याच्या पाठीशी उभे राहीले. 


पैश्याची थोडीफार मदत मित्रांनी केली. तो सुधरला होता. सोळाव्या दिवशी मित्र जेव्हा इस्पितळात त्याला आणायला गेले ,तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रु आले. 


        उमेश सुधारला पण अशक्त झाला होता. मित्र दोन त्याच्या जवळ त्याला आधार द्यायला गेले. तर उमेश म्हणाला," अरे.... मला तर कोरोना झाला होता ,तुम्ही हात लावु नका...! माझ्या दुर रहा..! तेव्हा मित्र त्याला म्हणाले , सोड यार मैत्रीसमोर काही बिमारी नाही." तुला काही झाले नाही, आणि आम्हालाही काही होणार नाही, दोन्ही मित्रांनी त्याला खांदा देऊन बगलेत पकडले व गाडित बसविले. व घरी आणले.



काही दिवसांनी उमेश चे आईवडील दोघेही पॉझिटिव्ह निघाले, दोघांनाही खाजगी रुग्णालयात भरती केले. पुन्हा पैश्याची जुळवाजुळव सुरु झाली. 



बाबा मनाने व तनाने धडधाकट होते, त्यांनी आलेले संकट सहन केले. आई मात्र नऊ लाख लागूनही वाचु शकली नाही. 


उमेश ची आई कोरोनामुळे देवाघरी गेली, तिला शुगर व बिपीचा त्रास होता. 


याही वेळेस मित्रांनी माणुसकी दाखविली आपल्या जवळील कोणी पन्नास हजार ,तर कोणी एक लाख देऊन या संकटाच्या वेळी मदत करुन माणुसकी दाखविली...!



माणसाची वेळेवर कामात आलेली मदत हिच खरी माणुसकी..!



मोहन सोमलकर 

नागपुर ✍✍✍🙏🙏📥

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...