मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

मंगळवार, २४ मे, २०२२

ब्रदर्स डे व बहिण दिवसाच्या शुभेच्छा

 


आज
दिवस
खुप खास
प्रतिलिपीवर
भेटले किती बहिणीचे नाते
त्या नात्यांचे फिरेल आज जाते
आठवण त्या माझी काढणार नाही विसरणार
या दादाला, या ह्दय वाटणार्‍या मनमोहनाला त्या
आठवण मी स्वाती बोराडे अन तनया बोरसे ची करतो
ह्या पहिल्यावहिल्या प्रतिलिपीवरील बहिणी झाल्या सदा दादाचा त्यांनी मला दर्जा दिला,आजही आठवण करतात
मग आल्या त्रिवेणी संगम जीवनात माझ्या तिन नद्या जश्या
एक कल्पनाताई only idea,  एक माझी कोमुताई (नात्याचा कोमल स्पर्श) दुसरी अनुताई माझी (खुप समंजस हळवे मन)
तिन्ही मिळाल्या दादांची काळजी करणार्या..! तिन ह्या आहेत त्रिवेणी संगम.!
मग
मिळाल्या
मेघाताई,
मायेने दादा म्हणणार्या मुक्तछंदात लिहणार्या
वृषालीताई, राजश्रीताई, प्रियाताई , रुहीताई
ह्या गझलसम्राज्ञी बहिणी मिळाल्या.!
कांचनताई, अश्विनीताई, पुष्पाताई, सुप्रियाताई, कमलाताई हनवते,
अनघाताई व दिक्षाताईची आहे बातच खुप निराली
मनात माझ्या वात्सल्य स्नेहाचा पिंगा घाली
निवडक मोतीतुन दादाला प्रेम देणाऱ्या
माझ्या आपल्या बहिणी
तसेच
शेतात काम करणारी
राबराब राबणारी
घाम गाळून
भाकरी
मिळविणारी
अन्न धान्य पिकविणारी
जुही, चंपा,चमेली, मोगरा, गुलाब, केवडा फुलवीणार्या
माझ्या बहिणी
वर्षा जगताप व अनुताई

ज्ञानाताई, निशाताई, रजनीताई ठाकरे,मंजुषाताई अपराजित
मनिषाताई
सदैव दादाची काळजी घेतात.!
जिवलगातील
पुष्पाताई,  ज्योती पवार (,परी), रश्मीजी
यांना मी कसा विसरणार..!
शब्दलेखणीवरील मिताली मोरे,
तसेच सुरेखा सोनवणे, स्नेहा सोनवणे ताई ,सोनाली वडनेरे
यांना मी कसा विसणार

शाहिन शेख ताईलाही मी कसा विसरणार!
मस्त चारोळ्या मी तिच्या वाचणार.!

विशाखा जाधव ताई खुप छान लिहिते
कवितेतून ती छान व्यक्त होते.!

काव्यपुष्पातील
चैतालीताई, अश्विनीताई, रजनीभागवत,
सदा मला कवितेसाठी मार्गदर्शन करणारी
माझी पल्लवीताई चरपे
या सगळ्यांनी आणि बर्‍याच ताई लोक आहेत
ज्यांची नावे  मी विसरलो असेल
त्यांना आजच्या दिवशी
माझा प्रणाम

मोहन सोमलकर
😊😊😊😊😊😊😊
Happy brodher day


गुरुवार, १९ मे, २०२२

वेदना

 


My gallery 

एक दिवस असाही ( लेख)

आपले घर स्वतःचे झोपडी का असेना ,तो आपल्याला सदा राजवाड्यागतच वाटत असतो. त्या घरात थोडी सुखसोयीची कमतरताही असली तरी त्यात आपण रोज सहज तडजोड करित असतो. आणि तडजोड ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे.

शशांक एक मध्यमवर्गीय व्यक्ती होता. एक मुलगी, बायको आणि तो  ..! एवढेच त्याचे कुटुंब मर्यादित..! तसे त्याचे संयुक्त कुटुंब होते.
एका भावाकडे आईवडील राहायचे व बाकी भाऊ वेगवेगळे राहायचे. पण कार्यक्रम प्रसंगी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने राहायचे.

शशांक ऑफीस मधुन रोज आला की, आपल्याच दिवाणखान्यात फ्रेश होऊन येऊन बसायचा.आपल्या आवडत्या सोफ्याच्या खुर्चीवर.!
बायको रेवती मग थंडगार पाणी प्यालात घेऊन यायची,त्याने तो घसा ओला करुन सुटकेचा श्वास घ्यायचा.

त्यांची पत्नी आणि मुलगी जीव की प्राण होती. दोन पैकी एक घरी नसली की ,तो उदास व्हायचा...!

म्हणुनच रेवती कधीच शशांकला सोडून माहेरी गेली नाही...!

पण एकदिवस रेवतीच्या वडिलांना मायनर हार्ट अ‍ॅटॅक आला , हा ऑफिसात ,आणि रेवती बिचारी मुलीला घेऊन धावपळीत जी बस मिळेल त्या बसने माहेरी पोहचली..!

शशांक ऑफीसमधून सतत रेवतीसोबत फोन वर होता. पोहचली काय म्हणुन...!  बाबांची तबियत कशी आहे हे विचारासाठी..!

रेवती दोन तासांनी माहेरी पोहचली, बाबांना भेटली ,बिलगुन रडु लागली...! बाबा ठीक होते हसत होते मुलीला पाहुन...!

शशांक बिचारा रात्री ऑफीसमधून आला , फ्रेश झाला व एक ग्लास पिऊन  न जेवता झोपी गेला, कारण त्याला विचारपूस करायला त्याची पत्नी व मुलगी घरी  नव्हती...!

एक दिवस असाही..!

मोहन सोमलकर
नागपुर


ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...