मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

गुरुवार, २६ मे, २०२२

चि. सौ.कां. अश्विनीताई राठोड व चि. सुनिल जाधव यांचा विवाह सोहळा

 


‼️‼️शुभविवाह  सोहळा‼️‼️


आज आहे घडी मुहूर्ताची 

प्रतिक्षा संपली तिची किती दिवसाची 

२६ मे चा तो दिवस शुभ उजाडला

सुरु झाली आज घाई अश्विनीताईच्या लग्नाची.!!


हि लेक स्व श्री. नागोराव व नंदाताई राठोडांची 

लई गुणवान, गुणगौरव घरण्याची 

आनंदात वाढलेली 

आनंदात अंगणी खेळलेली.!


आज पित्याचे पाहिलेले स्वप्न पुरे होत आहे

काल लागली अश्विनीताईला हळद 

आज बोहल्यावर उभी राहणार

आज तिचा शुभविवाह होत आहे.!


राठोडाची ही कन्या गुणवान 

चि. सुनिलांची सहचारिणी जाधव घराण्याची सुन होत आहे

पडतील आज तिच्या डोयीवर अक्षदा 

मंगलमय कार्य आज दोन परिवाराचे घडत आहे.!


उरी दाटुन आले मन माझे

दाटुन आला आज माझा कंठ खुप

जेव्हाचे जुडले अश्विनीताईचे लग्न 

म्हणे याल दादा अवश्य आशिर्वाद द्यायला येईल मला हुरूप 


आज नाही जाऊ शकलो तिच्या शुभ  कार्याला

अश्विनीताई व सुनिलरावांच्या विवाह सोहोळ्याला 

पण दोघांच्याही शिरी खुप मोठा आशिर्वाद राहिल 

खंत मनात उरी न जाण्याची आयुष्यभर राहील!


चि.सौ कां. अश्विनीताई व चि. सुनिल 

यांना होणार्या लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा‼️🎋🥳💐💐💐💐🎊🎊🎊💐🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊



बुधवार, २५ मे, २०२२

सुट्टीतील आठवण

 




●उन्हाळी सुट्टी निमित्त काव्यलेखन स्पर्धा●



□साहित्यिकांच्या हक्काचे व्यासपीठ..□

                      

               

 ============/@/===============÷÷


         विषय* - *सुट्टीतील आठवण*

    शिर्षक:-  " आनंद जीवनातला"

         

 

आठवते मज माझे बालपण

शिस्तबद्ध व खेळण्यात रमणारे होते मन

वर्षभर चालायची शाळा व अभ्यास 

आला उन्हाळा की यायचे आनंदी क्षण ॥१॥


त्या अभ्यासाच्या व शाळेच्या ताणातून मोकळे व्हायचो

संपताच परीक्षा लागल्या सुट्ट्या की आनंदी व्हायचो

मग ओढ लागायची मामाच्या गावी जायची

तिथल्या निसर्गात रमुन आनंद उपभोगायचो..॥२॥


ते गतजन्मीचे दिवस अजुनही आठवतात

गीत मनात सुखावून मग जातात

पुन्हा ते दिवस परत ना यायचे

बालपण ते आठवुन डोळ्यात अश्रु येतात..॥३॥


आता जग आहे बदलले सारे

बालपण मुलांचे हरवले ताणतणावात

अभ्यासाचे मोठे ओझे मुलांवर लादले जाते

वेदना मुलांच्या मनाच्या राहतो आपण पहात ॥४॥


आपल्या इच्छा व आकांक्षा आपण मुलावर लादतो

आपली स्वप्ने त्याच्यातुन पुरे करत असतो

आनंद जीवनाचा त्यांचा हिरावून घेतो

उन्हाळ्यातल्या सुट्टीतही अभ्यासाच्या घाणीला जुंपतो.॥५॥


म्हणुन  मुलांचे बालपण आपणच करतो बंदिस्त 

उन्हाळ्यातल्या सुट्टीचाही होतो अस्त

नका मुलांच्या डोक्यावर ताण देऊ जास्त 

त्यांचे बालपण नका करे असे उध्वस्त..!



मोहन सोमलकर 

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...