मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शुक्रवार, २७ मे, २०२२

सौ. रजनीताई भागवत यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

 


रजनीताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा‼️

🍫‼️🍫‼️🍫‼️🍫‼️🍫‼️🍫‼️🍫‼️


आकाश होते निरभ्र 

होते ते स्वच्छंद शुभ्र 

पावसाची येण्याची ती वेळ

आपल्या आगमनाचा झाला मेळ


पहाट कोवळी सोनेरी किरणांची

उगवली या धरणीवरी फुलत गेली

दिवस असाच कलेकलेने वाढत गेला

संध्या झाली सुर्य मावळुन रजनी आली


मैत्रीपूर्ण ते सर्वाशी नाते होते

उदारता , आनंदी हा स्वभाव होता

ज्ञानाची व्याप्ती अमर्याद तरी

अहंकार मनात कधीच दिसला नव्हता.!


आयुष्य आपले आनंदित राहावे

सुगंध जीवनात चंदनापरी दरवळावा

जीवनाच्या आकाशी इंद्रधनुष्य तुमच्या

सदा फुलत आणि बहरत रहावा..!


अपयश दुरच राहावे

यशाची सरिता आनंदाचा प्रवाह घेऊन यावी

सुखी तुमच्या जीवनात

मोगरा,जाई,जुई, चमेली या फुलांची मोहकता यावी.!


रजनीताईला वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा 

👑💐💐💐💐💐💐💐🍫💐💐💐💐💐



मनाने साठविलेल्या गोष्टी

================


असंख्य अश्या मनात

साठविलेल्या गोष्टी असे

ज्यांचे धागे कुठेतरी 

जुळलेले होते जसे...!


ती मनाची यंत्रणा

मेंदुपासुन मनापर्यंत होती जुळली

डोळ्यात ने जे आत्मसात केले

मेंदुला व मनाला ती गोष्ट कळली



कधी बोलल्या गेली 

कधी मनात साठवून ठेवली

गोष्ट अशी अमुल्य होती

तिला चारचौघांत नाही काढली


मन किती मोठे 

जणु भावना जपण्याची एक पेटी

गोष्ट साठवलेली कुठे बोलावी कुठे चुप्पी साधावी

ही मनाचीच तर आहे ऐटी...!




मोहन सोमलकर 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

©️®️

गुरुवार, २६ मे, २०२२

चि. सौ.कां. अश्विनीताई राठोड व चि. सुनिल जाधव यांचा विवाह सोहळा

 


‼️‼️शुभविवाह  सोहळा‼️‼️


आज आहे घडी मुहूर्ताची 

प्रतिक्षा संपली तिची किती दिवसाची 

२६ मे चा तो दिवस शुभ उजाडला

सुरु झाली आज घाई अश्विनीताईच्या लग्नाची.!!


हि लेक स्व श्री. नागोराव व नंदाताई राठोडांची 

लई गुणवान, गुणगौरव घरण्याची 

आनंदात वाढलेली 

आनंदात अंगणी खेळलेली.!


आज पित्याचे पाहिलेले स्वप्न पुरे होत आहे

काल लागली अश्विनीताईला हळद 

आज बोहल्यावर उभी राहणार

आज तिचा शुभविवाह होत आहे.!


राठोडाची ही कन्या गुणवान 

चि. सुनिलांची सहचारिणी जाधव घराण्याची सुन होत आहे

पडतील आज तिच्या डोयीवर अक्षदा 

मंगलमय कार्य आज दोन परिवाराचे घडत आहे.!


उरी दाटुन आले मन माझे

दाटुन आला आज माझा कंठ खुप

जेव्हाचे जुडले अश्विनीताईचे लग्न 

म्हणे याल दादा अवश्य आशिर्वाद द्यायला येईल मला हुरूप 


आज नाही जाऊ शकलो तिच्या शुभ  कार्याला

अश्विनीताई व सुनिलरावांच्या विवाह सोहोळ्याला 

पण दोघांच्याही शिरी खुप मोठा आशिर्वाद राहिल 

खंत मनात उरी न जाण्याची आयुष्यभर राहील!


चि.सौ कां. अश्विनीताई व चि. सुनिल 

यांना होणार्या लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा‼️🎋🥳💐💐💐💐🎊🎊🎊💐🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊



ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...