मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

 दिवाळी

महागाई दरवर्षीच जोर पकडत जाते

शेतात अन्नाचा दाणा पिकविणारा कर्जाच्या ओझ्याखाली दबत जाते


गरीब गरिबच होत आहे या देशात

रक्त शोषून घेत आहे भांडवलदार व शोषक समाजसेवकाच्या वेषात


कापुस, सोयाबीन, तुर,ज्वारी, बाजरीला कुठे शेतकऱ्यांला भाव मिळतो.!

बिचारा शेतकरी पाऊस, उन, थंडीत हाडाची काड करुन शेतात राबतो.!


शेतकरी आयुष्यभर राबतो, मात्र अडते ,ठोक व्यापारी त्याच्या भरोश्यावर पोळी आपली शेकतो व वरची मलाई खातो..!



तुरीला भाव येते 5800/- क्विंटल आणि त्याच तुरी पासुन तयार झालेली तुरीची दाळ घ्यावी लागते त्याला 12000 क्विंटल 


मग कशी होईल शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी

कशी साजरी होईल ,त्याच्या परीवाराची आनंदमयी दिवाळी.!


चला या वरषी लक्ष्मीमातेला शेतकर्यासाठी प्राथॅना करुया..!



मोहन सोमलकर🪔💥🪔💥🪔💥🪔🪔💥

६ टिप्पण्या:

  1. व्वा खूप छान लिहिलंय शेतकऱ्याची यशोगाथा खूप छान मांडली .
    खरच करूया आपण शेतकऱ्यांसाठी प्रथरना

    उत्तर द्याहटवा
  2. अगदी बरोबर लिहीले आहे मोहन दा तुम्ही. आपल्या अन्नदात्यासाठी ही दिवाळी छान होऊ दे हिच सदिच्छा 👌👌👌👌🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा
  3. शेतकऱ्यांची व्यथा खुप छान शब्दबद्ध केली आहे...खरच...शेतकरी सर्वांचा पोशिंदा असुनही त्याला मात्र खुप हलाखीचं जीवन जगाव लागत...!!😢
    अप्रतीम रचना, ह्रदयस्पर्शी...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...